अतिशय भिकार सर्विस. एक स्टारच्या पण लायकीचे नाही. कोणीही इथे थांबू नये. आजचा अनुभव आम्ही जेवणासाठी या ठिकाणी थांबलो होतो परंतु येथे ऑर्डर करण्याआधी मेनु कार्ड दिले नाही, ऑर्डर देताना आंबोळी ची दिली असून ही आम्हाला प्रत्यक्षात उत्तपा देण्यात आला. याबद्दल त्याला विचारले असता अत्यंत उर्मट पणे उत्तर मिळाले की, "तुम्ही आंबोळी मिळत नसतानाही अशी ऑर्डरच का दिली? जे दीलेलं आहे तेच खावं लागेल, भिकारी लोक, तुम्हाला दान केले असं समजा. जास्त लांबड लाऊ नका." विशेष म्हणजे या गृहस्थाने ऑर्डर साठी मेनुकार्ड दिले नाही, दिलेली ऑर्डर सोडुन भलताच मेनु स्वतः च्या मनाने आणला त्यातही उर्मट पणे म्हणतो की, तुम्ही काय वाकडं करणार आहात, निघा ईथुन... गिर्हाईक म्हणजे काय वाटतं याला ? पैसे देऊन अपमान करुन घ्यायचा असेल तर अवश्य येथे थांबावे..